Arkib bagi Julai, 2007

श्रेष्ठ कोण -धर्म ,विज्ञान का निसर्ग

मानवजन्म ही नैसर्गिक प्रक्रीया आहे .माणुस जन्माला आल्यावर त्याला माहीत असते का  त्याचा धर्म कोणता ,जात कोणती ते ? तर नाही. जसाजसा तो  मोठा होत जातो  त्याला कळु लागते . आपल्या धर्माबाबत. मानवाने आपल्या तल्लख बुद्धीने निरनिराळे शोध लावले. त्याप्रमाणे आपल्या राहणीमानात बदल केले.तरी पण श्रेष्ठ कोण हा प्रश्न उरतोच कारण प्रत्येक माणसाला धर्म आहे. त्याबरोबर विज्ञानाची जोड आहे.प्रत्येक जण निसर्गात वावरतो.

प्रत्येक धर्म हा मानवनिर्मित आहे. विज्ञान(तंत्रज्ञान) ही मानवनिर्मित आहे. निसर्गातिल प्रत्येक घटकाच्या मागे विज्ञान आहे. जन्मानंतर मृत्यु हे नैसर्गिक आहे ते कोणी थांबवू शकत नाही. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी विज्ञान सर्व गोष्टींवर मात करू शकत नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे सर्व काही समान आहे(उदा. धरणीकंप, चक्रिवादळे,इ) .

व्यसनाधीनता

लोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते. उदाहरणे द्यावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे -सिगारेटचे देता येईल .बिडी ओढणाऱ्यांपासुन ५५५ चे पाकीट ओढणारा .म्हणजेच व्यसनांची किंमत ही खालपासुन वरपर्यंत वाढत जाते. दारू च घ्या देशी पिणाऱ्यांपासुन उंची विदेशी पिणाऱ्यांपर्यंत .दुर्दैवाने म्हणाव लागत पण ती वस्तुस्थिती आहे वेश्या-बाजरात ही अशीच चढणारी आणि उतरणारी किंमत असते. आता गुटखा खाणाऱ्यांनाच विचारा मधला ‘ ट’ काढल्यास बहुधा ते काय खात असतील यांची कल्पना त्यांना येत असेल. जुगार खेळणाऱ्याचे ही तसेच आहे . छोटी खेळी खेळता खेळता मोठी खेळी तो कधी खेळू लागतो ते त्याच त्याला कळत नाही. म्हणजेच आपण अर्थ काढू शकतो की व्यसने ही सर्व वर्गासाठी आहे पण ऐपतीप्रमाणे . गरीबांची व्यसने वेगळी, मध्यमवर्गाची वेगळी , उच्चभ्रु वर्गाची वेगळी . लहानपणी वाचले होते भुगोलाच्या पुस्तकात विविधतेतच एकता आहे ती एकता बहुधा  व्यसनांना लागू पडते. आपण म्हणतो तो वाया गेलाय का तर तो सिगारेट पितो. पण सिगारेट पिणारा वाया कसा जातो ते हळूहळू लक्षात येते.आधी सिगारेट मग दारू मग पुढेपुढे व्यसनांची पायऱ्या चढत तो कसा वाया जातो आणि आपण त्याच्यासाठी एक गाण ही म्हणतो -काय होतास तु काय झालास तु ,अरे वेड्या मुला वाया गेलास तु. पण आपल दुर्देव असे की हल्ली व्यसन ही फॅशन बनलीय. काळाप्रमाणे चालणे आपल्याला आवडत असल्याने आपण बहुधा व्यसनांकडे दुर्लक्ष करतो .आपला शारीरीक व मानसिक  ऱ्हास होतोय हे आपण विसरतो. किंवा कळतय पण वळत नाही. म्हणूनच कोणितरी म्हटलय व्यसन हे कधीही सुटत नाही ते सोडण्यासाठी निश्चय करावा लागतो. चला पाहूया निश्चय करून.

प्रेम कसे करावे.

प्रेम कसे करावे पण एखाद्या सुंदर तरूणीवर.सर्वच तरूण आणि तरूणी एका विशिष्ट वयात आल्यावर प्रेमात पडतात. त्यातील काही जण प्रियकर प्रेयसी होतात उरलेले एकतर्फी प्रेम करतच असतात. पण एकतर्फी प्रेमाला वयाचे बंधन नसते लग्न झाले असले तरिही माणसाला कोणिना कोणी आवडत असतेच. एकतर्फी प्रेम हे मुक असते . त्यातून ज्या घटना घडतात किंवा त्या प्रेमाचा जो उद्रेक होतो प्रेयसीला संपवण्यात तो चुकीचा आहे. तर आपला विषय पुर्णत:हा वेगळा आहे .एखाधा सुंदर तरूणीवर प्रेम कसे करावे. सुरवातीला माणूस जेव्हा प्रेम करायला लागतो तेव्हा ते एकतर्फीच असते. प्रेमाची व्याख्या कोणिही सांगू शकत नाही. ते कसेही होऊ शकते. असे असले तरिही मूळ प्रश्न राहतोच प्रेम कसे करावे. आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होईल का कधीतरी असा आपण विचार करत असतो. पण ते प्रेम व्यक्त करायला नेहमी घाबरत असतो. ती नाही म्हणाली तर त्यामुळे विचारण्याच नेहमी आपण टाळत असतो. तरीही आपण प्रेम करत असतो. कधी कधी विचार करतो आयुष्य हे एकदाच मिळत असत त्या आयुष्यात तीचीही आपल्याला साथ हवी. पण आपण विसरत असतो तीलाही आयुष्य एकदाच मिळत असत. कधीतरी तिच्यासमोर आपले प्रेम आपण व्यक्त करतो होकार मिळाला तर पाच सहा दिवस हवेत उडत असतो नकार मिळाला पाच सहा दिवस दाढी वाढवून, मौन बाळगून मिळालेल्या नकाराचा निषेध व्यक्त करत असतो. तरिही आपण प्रेम करत असतोच . असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे चुकीचे आहे कारण दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे. प्रेमी युगुलाला पाहून आपण मनातल्या मनात जळतो त्यातूनच मग कविता,चारोळ्या,गझल लिहू लागतो आणि आपले प्रेम प्रकट करत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मग ती कशी माझ्याविना जगते तेव्हा आपण विसरत असतो तिलाही आयुष्य आहे विचार आहे. कधी कधी जीव धावासा वाटतो तर का फक्त एका नकारामूळे .अश्या वेळी आपल्यावर जिव असलेल्या आई ,बापाचा,नातेवाईकांचाही आपल्याला विसर पडतो ह्यालाच का आपण प्रेमाची विलक्षण ताकद म्हणतो. म्हणूनच वाटते की प्रेम कसे करावे या प्रश्नाचे उत्तरे शेवटी अनुत्तरीतच राहतो.

विचार आणि चमत्कार.

लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक  बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले  अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.